पोलिस पाटलांना विमा सरक्षण देण्याची मुख्यामंत्रयांकडे धनंजय मुंडे यांची मागणी…!
परळी : पोलीस पाटील यांना विमा संरक्षण देण्याची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी एका पत्राव्दारे केली
आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले की,गावपातळीवर पोलीस पाटील हे पोलीस,महसुल आणि जनता यांच्यातील महत्वाचा दुवा म्हणुन काम करत असतात.कोविड-१९ पार्श्वभुमीवर सध्या ग्रामीण भागात मुंबई,पुणे व इतर महानगरातुन परतणार्या ग्रामस्थांची मोठी संख्या आहे.या बाहेरून आलेल्या ग्रामस्थांना क्वारंटाईन करणे यासाठी हे पोलीस पाटील अथक परिश्रम घेत असुन,महसुल व पोलीस प्रशासनास मोठया प्रमाणावर मदत करत आहेत.
कोरोनाच्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभुमीवर या पोलीस पाटलांना ही विमा सरक्षण देण्याची आवश्यका आहे,याबाबत सकारात्मक निर्णय करावा अशी मागणी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे