ना.धनंजय मुंडे यांच्या सूचनेवरून वाल्मीक अण्णा कराड यांच्यावतीने पांगरी येथे नागरिकांना घर पोच किराणा किट वाटप!
परळी : कोरोनाव्हायरसच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन लागू झालेल्याला जवळ-जवळ दीड महिना झाले आहे. आणि लाॅक डाऊनचा कार्यकाळ पुढे १४ दिवस,म्हणजे १७ मे पर्यंत वाढवला आहे.या काळात अनेक उद्योग व्यवसाय कामधंदे बंद पडल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून बीड जिल्ह्यातील अशा नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी व मदतीसाठी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे हे बारकाईने लक्ष ठेवून अहोरात्र जनतेला मदत करण्यासाठी मेहनत घेत आहेत.ना.धनंजय मुंडे यांच्या सूचनेवरून कोरोनाव्हायरस व लाॅक डाउनमुळे अडचणीत असलेल्या जनतेला नाथ प्रतिष्ठानच्या वतीने राशन आणि किराणा सामानाची किट हजारो नागरिकांना वाटप करण्यात आली आहे.त्याचाच एक भाग म्हणून ना.धनंजय मुंडे यांच्या सूचनेवरून पांगरी करांच्या समस्यांसाठी नेहमी तत्पर लेले,मदती साठी धावून जानारे गावचे भूमिपुत्र तथा न.प.परळी रा.काँ. गटनेते मा.वाल्मिक अण्णा कराड यांच्या वतीने पांगरी गाव आणि परिसरातील आठशे कुटुंबांना किराणा बाजार किटचे गुरुवार दि. ३० एप्रिल व शुक्रवार दि.१ मे महाराष्ट्र दिन कामगार दिनी वाटप करण्यात आले. काही दिवसांपूर्वीच वाल्मीक अण्णा कराड यांच्या वतीने सर्व गावकऱ्यांच्या राशनचे पैसे भरून गावकऱ्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी घरपोच तीन महिन्याचे राशन ग्रा.पं. पांगरीच्या वतीने वाटप करण्यात आले. पांगरीच्या नागरिकांना तहसीलच्या वतीने तलाटीं मार्फत तीन ते सहा महिन्यांचे राशन वाटप करण्यात येते.या सर्व राषनचे पैसे मा.वाल्मिक अण्णा कराड यांनीच भरून ग्रामपंचायतच्या वतीने तलाठी मार्फत घरपोच राशन वाटप करण्यात आले आहे.आणि आता किराणा बाजारही घरपोहोच वाटप करण्यात आल्याने पांगरी गाव व परिसरातील कुटुंबांना किराणा बाजारचे घरपोच वाटप केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.या किराणा किटमध्ये साखर, चहा पत्ती,गोडतेल,मुग डाळ,मिरची पावडर,हलदी पावडर,तांदूळ,यांसह दैनंदिनीच्या उपयोगातील किराणा वस्तू आहेत.आज कोरोनाव्हायरस व लाॅक डाऊनच्या पार्श्वभूमीवर अनेक जण अडचणीत असलेल्या जनतेला मदत करत आहेत परंतु मदत थोडी व प्रसिद्धी जास्त असाच काहीसा प्रकार बऱ्याच अंशी दिसून येत आहे.मात्र वाल्मीक अण्णा कराड व ग्रामपंचायत पांगरी यास अपवाद ठरले असून आज पर्यंत लाखो रुपयांची मदत पांगरी करांना करूनही प्रसिध्दी पासून दूरच आहेत,ही बाब माझ्यासारख्या गावच्या पत्रकाराच्या नजरेतून सुटू शकली नाही म्हणून याचा येथे आवर्जून उल्लेख करावा वाटतो.या किराणा किटच्या वाटपासाठी ना.धनंजय मुंडे यांच्या सूचनेवरून मा वाल्मीक अण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच पती सुशील कराड,दत्ता कराड(ग्रा.पं.सदस्य) महादेव कराड, दिगंबर खेत्रे यांनी किराणा किटचे घरपोच वाटप केले.ना.धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात आणि मा.वाल्मिक अण्णा कराड यांच्या र्गदर्शनाखाली गावकऱ्यांच्या मदतीसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत असे सरपंच पती श्री.सुशील कराड यांनी यावेळी म्हटले….