अतिवृष्टीने खराब झालेल्या पिकांचे सर्वे करून मदत द्या अशी भूमिपुत्र शेतकरी संघटनेची ची मागणी
दिपक मापारी* प्रतिनिधी रिसोड भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री मा.ना. उद्धवजी ठाकरे साहेब, महसूल मंत्री मा.ना. बाळासाहेब थोरात, कृषी मंत्री मा. दादाजी भुसे साहेब, यांना विदर्भ मराठवाड्यातील गेल्या पंधरा दिवसापासून अतिवृष्टी ने खराब झालेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी. म्हणून निवेदन देण्यात आले आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनामध्ये भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, विष्णुपंत भुतेकर, यांनी खरिपातील बोगस, बियाणे, आणि उत्पादक कंपन्याच्या गोरखधंदयामुळे विदर्भ मराठवाड्यातील पंचवीस टक्के शेतकरी दुबार, तीबार पेरणी करूनही उत्पादनापासून वंचित राहिले. खरिपातील पीक हातात येण्याची वेळ निर्माण झाली. असताना अजूनही पन्नाश टक्के शेतकरी कर्जा पासून आणि पात्र असूनही कर्ज माफी पासून वंचित आहेत. असे असूनही शेतकऱ्यांनी स्वतःच्या हिमतीवर पेरणी केली. उडीद, मूग, सोयाबीन, कापूस, हळद, व अन्य पिके जोमात असताना गेल्या पंधरा दिवसापासून अतिवृष्टी आणि सततधार पावसाने हाता-तोंडाशी आलेले पिके खराब व्हायला लागली. मुंग, आणि उडदाचे, पीक पूर्ण पणे हातातून गेले. तर सोयाबीन आणि कपाशी व इतर पिके पानथळ जमिनीतील खराब होत आहेत. पिक विमा घेणाऱ्या शेतकऱ्यांना तर विमा कंपन्यांनी मदत दिलीच पाहिजेत. तसेच शासनाने सर्व अतिवृष्टीने खराब झालेल्या पिकांचे पंचनामे करून हेक्टरी पंचवीस हजार रुपये तात्काळ मदत घ्यावी. अशी विनंती भूमिपुत्र शेतकरी संघटनेकडून करण्यात आली आहे.