मुंबई-पुण्यात १८ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवला जाऊ शकतो – राजेश टोपे
मुंबई : दि. ४ मे रोजी देशासह राज्यातील लॉकडाउन कदाचित मागे घेतला जावू शकतो. पण मुंबई आणि पुण्यातील करोनाबाधितांची वाढती संख्या पाहता या दोन्ही शहरात १८ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवला जाऊ शकतो. कदाचित या दोन्ही शहरांमधील कंटेन्मेंट झोनपर्यंत हा निर्णय मर्यादित असू शकतो, अशी शक्यता आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी वर्तवली आहे. त्यामुळे मुंबई-पुणेकरांना ३ मेनंतर आणखी १५ दिवस घरात थांबावं लागण्याची शक्यता आहे.