खरिप हंगामा मध्ये आतीवृष्टीने नष्ट झालेल्या पिकांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याची कमलताई राठोड यांची मागणी
पाथरी(आवडाजी ढवळे):पाथरी तालुक्यातील चार हि मंडळा मध्ये जोरदार आतीवृष्टी झाल्या मुळे यंदाच्या खरिप हंगामातील पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे या पिकांचे पंचनामे करुन तात्काळ नुकसान भरपाई द्यावी आसी मागणी राष्ट्रवादी काॅग्रेसच्या ओबीसी विभाग महिला जिल्हाअध्यक्षा कमलताई राठोड यांनी पाथरी येथील उपविभागीय अधिकारी व पाथरीचे तहसीलदार यांच्याकडे एका निवेदना द्वारे केली आहे सविस्तर वृत्त आसे कि पाथरी तालुक्यातील चार हि मंडळा मध्ये जोरदार आतीवृष्टी झाल्या मुळे यंदाचे खरिप हंगामातील तीळ,मुग,उडित पिक हातचे गेले आहे तर कापसाचे बोड झडले आहेतर काही लाल पडले आहेत या मुळे कापुस पिकांचे हि मोठ्या प्रमाना मध्ये नुकसान झाले आहे याच बरोबर जोरदार आतीवृष्टी मुळे सोयाबीन च्या शेंगा फुटुन मोठे नुकसान झाले आले आणि शेता मध्ये ही मोठ्या प्रमाना मध्ये पाणी साचले आहे याने पिक सडुन जात आहे म्हणुन हातातोडासी आलेले सोयाबीनचे पिक ही नष्ट होण्याच्या स्थीतीत आहे म्हणुन प्रशासनाने पाथरी तालुक्यातील सर्व मंडळा मधिल शेतकर्यांच्या पिकांचे पंचनामे करुन तात्काळ पिक विमा मंजुर करावे आणि शेतकर्यांना पिकांची नुकसान भरपाई द्यावी आसी मागणी राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टीच्या ओबिसी विभाग महीला जिल्हाअध्यक्षा कमलताई राठोड यांनी दि.२१/९/२०२० रोजी पाथरी येथील उपविभागीय अधिकारी व पाथरीचे तहसीलदार यांच्या कडे एका निवेदना द्वारे केली आहे सदर निवेदनावर कमलताई राठोड,शेख मुस्ताक शेख अमीन,कविता पवार,व्यंकटराव गिते व प्रीती ताई आदींच्या स्वक्षरी आहेत