कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या २१ जणांचे अहवाल घेतले तर अन्य १० जणांना क्वारंटाइन

परतूर (शेख अथर) – मुंबई वरून तालुक्यातील मापेगाव येथे आलेल्या एका कुटुंबाला गावातील जिल्हा परिषद शाळेत क्वारंटाइन करण्यात आले होते.त्यातील एकास श्वास घेण्यास त्रास होत असल्याने शुक्रवारी जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते सदरील मयत व्यक्तीच्या लाळेचे नमुने घेऊन प्रयोगशाळेका पाठवण्यात आले होते.मात्र अहवाल प्राप्त होण्याअगोदरच उपचार सुरू असतांना मध्यरात्री त्या संशयित रुग्णाचा मृत्यू झाला होता त्याचा अहवाल ३१ मे च्या मध्येरात्री पॉजिटिव्ह प्राप्त झाल्याने आरोग्य विभागाच्या वतीने त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीच्या बाबतीत माहिती गोळा केली त्यातील त्यांच्या संपर्कात आलेल्या २१ जणांच्या लाळेचे नमुने घेऊन प्रयोगशाळेला पाठवण्यात आहेत आहेत तर अन्य दहा जणांना क्वारंटाइन करण्यात आले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ सय्यद जाहेद यांनी दिली.पुढे त्यांनी सांगितले की गावातील  सर्वच कुटूंबांचे सर्वेक्षण करण्यास सुरुवात करण्यात आली यासाठी तीन पथकाची स्थापना करण्यात आली सदरील सर्वेक्षण हे दररोज करण्यात येणार असून  यासर्व कामी आरोग्य विभागाचे पथक दिवसभर गावात तळ ठोकून होते यांच्या सोबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ सय्यद जाहेद,आरोग्य अधिकारी डॉ शिवाजी निलवर्ण,गटविकास अधिकारी व्ही बी बोडखे,विस्तार अधिकारी युवराजसिंग परदेशी,डॉ अंभुरे,डॉ राऊत आरोग्य सेविका,अंगणवाडी ताई,आशाताई यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य इंद्रजित घनवट,सरपंच दुगाने,सकाळकर ग्रामसेवक,तलाठी व स्थानिक स्वयंसेवक यांनी गावात नागरिकांच्या तपासणीसह अन्य कामात मदत केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *