जिंतुर नगरपालिका प्रशासनाच्यावतीने दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा सर्व सामान्य नागरिकांच्या आरोग्यास धोका..
जिंतुर : जिंतुर नगरपालिका प्रशासनाच्या वतीने मागील चार पाच दिवसापासून दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा होत असल्याने सर्व सामान्य नागरीकांना पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे व ही समस्या तात्काळ लक्ष देऊन सोडविण्यात यावी अशी मागणी नगरसेवक ऍड. गोपाळ रोकडे यांनी एका निवेदनाद्वारे तहसिलदार सुरेश शेजुळ यांच्याकडे केली आहे याबाबत दिलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की सध्या जागतिक संकट कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसंदिवस वाढत असल्याने त्यांच्या वर मात करण्यासाठी देशपातळीवर आरोग्य विषयक जनजागृती केली जात आहे परंतु जिंतूर नगर पालिकेच्या निष्काळजी पणामुळे मागील चार ते पाच दिवसापासून विजनिर्मितीसाठी वापरलेल्या दूषित व दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांना उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे एकीकडे लॉकडाऊन सुरू असल्याने बाहेर निघता येत नसल्याने नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे म्हणून भविष्यात नागरिकांच्या आरोग्यास धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून तहसीलदार साहेबांनी या गंभीर समस्यकडे लक्ष केंद्रीत करून सदरील समस्या सोडवावी अशी मागणी विरोधी पक्ष्याच्या नगरसेवकांनी दिनांक २६/०४/२०२० रोजी एका निवेदनाद्वारे केली आहे,दिलेल्या निवेदनावर नगरसेवक ऍड. गोपाळ नागोराव रोकडे ,विलास भंडारे ,संतोष आंधळे ,माजी नगरसेवक गणेश कुऱ्हे सह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत